पंजाबमध्ये बीएसएफची कारवाई : पाच दहशतवादी ठार

अमृतसर वृत्तसंस्था । पंजाबच्या तारण तारण जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफने आज पहाटे भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पाच घुसखोर दहशतवाद्यांना ठार केले.

बीएसएफच्या १०३ बटालियनने पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर आज सकाळी धडक कारवाई केली. यात त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यानंतर सैनिकांनी घुसखोरांना थांबण्यास सांगितले पण त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर बीएसएफच्या जवानांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला त्यात पाच घुसखोर ठार झाले. ही घुसखोरी पाकिस्तानच्या भिखीविंद उपविभागातील गावाकडून करण्यात येत असल्याचे दिसून आले.

बीएसएफच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, बीएसएफच्या जवानांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली असून यात काही नवीन घुसखोर दडून बसलेले असल्याची शक्यता आहे.

Protected Content