ब्रेकींग : वीज कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा ! :

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासगीकरणाच्या विरोधात महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला असून यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेेत यावर तोडगा निघाला आहे.

राज्यात वीज पुरवठ्याच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अडाणी समूहाने यासाठी परवानगी मागितली आहे. अर्थात, महावितरणचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याच्याच विरोधात महावितरणचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी काल मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. आज दिवसभरात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने देखील करण्यात आली.

दरम्यान, काल रात्री बारा वाजेपासून अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपापले काम बंद केले आहे. सध्या तरी यामुळे फार काही स्थिती विकोपाला गेलेली नसली तरी अनेक ठिकाणी खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.

या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी संपावर तोडगा निघाल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, आमची वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला कंपन्यांचं कुठलीही खासगीकरण करायचं नाही. याउलट राज्य सरकार पुढच्या तीन वर्षांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. पॅरेलल लायन्सेस, संदर्भात नुकतच एमआरसीकडे एक अर्ज दाखल केलाय. पॅरेलल लायसन्स आल्यानंतर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात मी कर्माचार्‍यांना आश्वास्त केलेलं आहे. आता काढलेलं नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढलं होतं. एमआरसी नोटीस काढेल, असं फडणवीसांनी सांगितलं.

Protected Content