‘भारत जोडो’ यात्रेमुळे कॉंग्रेसला मिळणार उभारी : पृथ्वीराज चव्हाण

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे कॉंग्रेसला उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

आज सातारा येथे पत्रकारांशी बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी कॉंग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्राच मोदींच्या पराभवाचे कारण ठरेल, असे चव्हाण यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी कॉंग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे कॉंग्रेसला उभारी मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात एक अपेक्षा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमधूनही कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जायला हवी होती, आपण ही निवडणूक सोडलेय, असा संदेश भाजपला जाता कामा नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Protected Content