बाळासाहेबांना कधी भोंग्याची गरज पडली नाही : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीही भोंग्याची गरज पडली नाही अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

आज व्यंगचित्रकार दिन आहे. या पार्श्‍वभूमिवर, बोलतांना खासदार संजय राऊत यांनी राजक ठाकरे यांना लक्ष्य केले. सध्या देशात आणि राज्यातही एकाधिकारशाही, मनमानी सुरू आहे. उत्तम व्यंगचित्रकारांकडून राज्यात भोंग्यांचे राजकारण केले जात आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

खा. संजय राऊत म्हणाले, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी व्यंगचित्रातूनच विरोधकांवर  टीका केली आणि देशात सत्तापरिवर्तन केले. विरोधकांवर टिका करायला, बाळासाहेबांना कधीही भोंग्याची गरज पडली नाही. बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हेच उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यामुळे त्यांनी आपली मते आणि भावना या व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडाव्यात असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content