अमळनेर प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे येथील ऐतिहासिक दगडी दरवाज्याची भिंत रात्री अचानक कोसळली. सुदैवाने जीवित हानी टळली.
याबाबत वृत्त असे की, शहरात रात्री नऊच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. यानंतर सुमारे दहा वाजेच्या आसपास दगडी दरवाजाची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. घटनास्थळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, माजी आमदार साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील यांनी भेट दिली. या दरवाजाचा काही भाग जीर्ण झाल्यामुळे याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी कधीपासूनच होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे आरोप नागरिक करत आहेत.