महाराष्ट्रातील पदांसाठी चेन्नईच्या वर्तमानपत्रात जाहिरात : आदित्य ठाकरेंचा नवा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप लावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्यात आल्याचा गौप्यस्फोट करून सरकारला जाब विचारला होता. यानंतर बल्कड्रगचा प्रोजेक्टही अन्यत्र हलविण्यात आल्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, वांद्रा वर्सोवा सी लिंक प्रोजेक्टला इंजिनिअर्स हवे असून यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर तामिळनाडूतील वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पात्र उमेदवार असतांनाही ही जाहिरात चेन्नईच्या वर्तमानपत्रात देण्याचे कारण काय ? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

 

Protected Content