Accident : भरधाव कारचा अपघात; एक ठार, चार गंभीर जखमी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडाकडे जात असलेल्या कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

 

याबाबत माहिती अशी, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना चालक भैय्या मधूकर बारी (वय-२४) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालक भैय्या बारी हा जागीच ठार झाला तर इतर अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर चौघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील नांदेड व रोटवद दरम्यानच्या रस्त्यावर घडला. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहेत. तर मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content