Home Cities यावल फैजपूरात ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’चे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

फैजपूरात ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’चे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते, २२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यात ज्या नागरिकांनी प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्याचे चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने दहशतवादाविरोधात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सन्मान व आदरांजली व्यक्त करण्यासाठी २१ मे रोजी ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ काढणार आहेत.

यात्रेचा मार्ग आणि उद्देश
ही यात्रा बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता फैजपूर, ता. यावल येथील धनाजी नाना महाविद्यालयात स्थित ‘प्रेरणास्तंभ’ पासून सुरू होईल आणि छत्री चौक येथील ‘स्वतंत्रता स्मारक’ पर्यंत काढण्यात येणार आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश पहेलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहणे आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवणे हा आहे.

देशप्रेमी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप पवार यांनी देशावर आणि भारतीय सेनेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या भारतीय सैनिकांनी दहशतवादाविरोधात जो पराक्रम दाखवला आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. या यात्रेत सहभागी होऊन आपण आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवूया,” असे आवाहन प्रदीप पवार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound