आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकरी बांधव सरसकट शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत.

 

आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपळे खु, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सर्वाधिक फटका लाख मोलाच्या कापसाला बसत आहे.

कापसाच्या बोंडांमधील सरकीला कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या भागात सततच्या पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भरभरून दिले अन् हिरावूनही घेतले.

सततच्या पावसामुळे कापूस तसे मक्याच्या कणसांना कोंब फुटले असून सोयाबीनचे पीक डोक्यावर आलेले आहे. यंदा निसर्गाने भरभरून दिले; पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अशी परिस्थिती आहे. नुकसानग्रस्तांना सरसकट शासकीय मदत मिळावी. अशी अपेक्षा शेतकरी बांधव करीत आहे.

Protected Content