सुशांत आत्महत्या प्रकरणावरुन भाजप राजकारण करतेय : हसन मुश्रीफ

अहमदनगर (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी मुश्रीफ बोलताना पुढे म्हणाले की, ज्यांनी ५ वर्षे राज्याचे गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे, असेही हसन मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असल्याचे नमूद केले. तसेच प्रशासनाला रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

Protected Content