समतानगरात तलवार हल्ला; पोलीसात तक्रार घेत नसल्याने एस.पी. कार्यालयात ठिय्या

जळगाव प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून समता नगरात तीन जणांवर चार ते पाच तरूणांनी तलवारने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अरूण सोनवणे, गोकुळ सोनवणे, कैलास सोनवणे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, पोलीस तक्रार घेत नाही म्हणून जखमींसह त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रात्री ठिय्या मांडला होता. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर गोंधळ शांत झाला.

जखमींनी दिलेली माहिती अशी, समता नगरात अरूण सोनवणे, गोकुळ सोनवणे व कैलास सोनवणे हे तिघे तरूण वास्तव्यास आहेत़ रविवारी रात्री चार ते पाच तरूण ही अरूणच्या घरी आली़ आणि त्यांनी ‘तु ट्रॅक्टरवरील काम का सोडले’ असा जाब विचारत अचानक तलवारने वार केला. त्यानंतर त्यांनी लागलीच जवळच राहत असलेले गोकूळ आणि कैलास यांच्याकडे जावून त्यांच्यावरही हल्ला केला़ तलवार हल्लयात तिघांच्या हाताला तसेच छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली़ हल्ला केल्यानंतर ती तरूण मंडळी तेथून पसार झाले.

जखमी तिघं तरूणांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली़ यावेळी त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली़ परंतु, पोलीस तक्रार घेत नाही, म्हणून जखमींसह त्यांच्या नातेवाईकांनी चक्क रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला़ नंतर कारवाई व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक आवारात ठिय्या मांडला. त्यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांनी त्याठिकाणी येवून जखमी व त्यांच्या नातेवाईकांची समजूत घातली व त्यानंतर जखमींना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात पाठविले.

Protected Content