संघ-भाजपची विचारसरणी आरक्षण विरोधी- राहूल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था । संघ आणि भाजपची विचारसरणी ही आरक्षण विरोधी असून त्यांना एससी आणि एसटी समुदायांचा विकास नको असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केली आहे.

आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावरून राहूल गांधी यांनी आज संघ व भाजवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी आरक्षण विरोधी आहे. त्यांना एससी/एसटी समाजातील लोकांचा विकास नकोय, ते संस्थात्मक रचना मोडीत काढत आहेत. मी एससी, एसटी, ओबीसी व दलितांना सांगू इच्छितो की, आम्ही आरक्षण कधीच संपुष्टात येऊ देणार नाही, हा घटनेचा मुख्य भाग आहे. यासाठी मोदीजी किंवा भागवत यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी काही फरक पडणार नाही. आज राज्यघटनेवर आक्रमण होत असून भाजपा व आरएसएस कोणत्या ना कोणत्या प्रकारे आरक्षण घटनेतुन काढू इच्छित असल्याचाही राहुल गांधी यांनी आरोप देखील राहूल गांधी यांनी केला आहे.

Protected Content