श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

श्रीनगर : वृत्तसंस्था| लावापोरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या जोरादार चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मंगळवारी सुरू झालेली ही चकमक आजही सुरूच आहे. जवानांची एक सयुंक्त तुकडी ही कामगिरी राबवत आहे.

चकमक सुरू असलेल्या ठिकाणी काही स्थानिक तरूणांकडून दगडफेक केली गेली, यावेळी त्यांना पळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधारांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला.

मंगळवारी जवानांना दहशतवादी दडून बसलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. त्यानुसार एका संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला, ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

Protected Content