संजय राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- शेलारांचा सल्ला

 

 

मुंबई : प्रतिनिधी । आपल्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यामुळे संजय राऊत हे बिथरले असून यामुळे त्यांना आता मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचा खोचक सल्ला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

ईडीच्या नोटीसीवरून भाजप आणि शिवसेनेच जुंपली आहे. यात आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे”, अशी टीका शेलार यांनी केलीय. राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील”, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर शरसंधान साधलं.

“संजय राऊत यांची वक्तव्ये पाहिली असता त्यांना भाजपविरोधाशिवाय काहीच दिसत नाही, हे स्पष्ट होतं. माझं त्यांना मित्र म्हणून सल्ला असेल की त्यांनी तात्काळ एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून उपचार करुन घ्यावा. त्यासाठी महापालिकेने प्रभादेवीला चांगलं हॉस्पिटल सुरु करावं”, असा टोला शेलार यांनी लगावला.

Protected Content