शोएब अख्तरने तोडले अकलेचे तारे !…म्हणे काश्मीर काबीज करून भारतावर हल्ला करू

 

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारताच्या विरोधात गरळ ओकत पाकिस्तान हा काश्मीर काबीज करून भारतावर हल्ला करू शकतो अशी दर्पोक्ती केली आहे.

पाकिस्तानमधील समा टीव्ही या वृत्तवाहिनीतील एका मुलाखतीदरम्यान शोएब बरळला आहे. समा टीव्हीला दिलेला मुलाखतीत शोएब म्हणतो की, गजवा ए हिंद या युद्धात नद्या दोनदा रक्तानं लाल होतील. अफगाणिस्ताहून सेना अटकपर्यंत पोहचेल, उजबेकिस्तानहूनही अनेक तुकड्या भारतापर्यंत पोहचतील. या सगळा भाग लाहोरशी जोडला जाईल. काश्मीरवर ताबा मिळवल्यानंतर भारतावर आक्रमण होईल. भारताचे शासक बेड्यांमध्ये जखडले जातील असंही शोएब सांगतोय.

शोएबचं हे विधान आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे, आणि भारतीयांकडून शोएबवर टीकेची झोड सुरु झाली आहे. शोएब याआधीही भारताविरोधात गरळ ओकत आला आहे.

 

Protected Content