शेतातील गोठ्यातून बोकडांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाथरी शिवारामधील शेतातील गोठ्यातून सव्वा लाख रुपये किंमतीचे १३ बोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील पाथरी येथील अभिमान नारायण धनगर (वय-६०) हे वास्व्यास आहे. त्यांचे गावालगतच शेत असून त्याठिकाणी गोठा आहे. दि. १७ रोजी रात्री ९.३० ते दि. १८ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरटयांनी त्यांच्या शेतातून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १३ बोकड चोरुन नेले. ही घटना उघडकीस येताच अभिमान धनगर यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सङ्गौ राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content