शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जामनेरकरांनी पाळला १ दिवशीय बंद

 

 

जामनेर : प्रतिनिधी । नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आज जामनेरातही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला

शेतकरी राजाच्या हक्क मागणीसाठी दिल्ली येथे मोठ आंदोलन सुरु आहे. आज भारत बंद चा नारा दिला गेला. भारत_बंद दरम्यान जामनेर शहरवासीयांनी आपली दुकाने स्वताः बंद ठेवली होती . या लढयात आम्हीही पाठिशी आहोत .असा विश्वास व्यापार पेठ बंद ठेऊन दिला आहे .

महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत जामनेर कडकडीत बंद ठेवण्यात आले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी न पा मुख्य चौकात ठिय्या मांडून केंद्र सरकार बाबत रोष व्यक्त केला .पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली शहरात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला .

Protected Content