शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार आहे असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Protected Content