लग्नाआधी वरपिता आणि वधूची आई गेले पळून !

images 8

 

सुरत (वृत्तसंस्था) साखरपुडा झाल्यानंतर दोघं घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु असतांनाच चक्क वरपिता आणि वधूची आई हे सोबत गेले पळून गेल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडलीय. या दोघांमध्ये बालपणापासून एकमेकावर प्रेम होते, अशी माहिती समोर आली आहे.

साधारण वर्षभरापूर्वी शहरातील एका तरुण आणि तरुणीचा साखरपूडा झाला होता. त्यानंतर वर्षभरापासून दोघं घरांमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र लग्न अगदी एक महिन्यावर आले असतानाच मुलाचे वडील आणि मुलीची आई एकमेकांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नवरदेवाचे वडील १० जानेवारीपासून बेपत्ता झाले आहेत. हे दोघं जण एकमेकाला लहानपणापासूनच ओळखत होते. “कटारगम येथील सोसायटीमध्येयांची कुटुंबे शेजारीच रहायची,असेही कळते.

Protected Content