रत्नागिरीतील पोसरेतही दरड कोसळली, 17 मृत्यू

 

मुंबई : वृत्तसंस्था । रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरेतही दरड कोसळली या  दुर्घटनेत 17 जणांचे मृत्यू  झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे

 

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

 

रायगड जिल्ह्यात  पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत.  त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 89 वर गेला आहे.

 

Protected Content