मोदींनी पाकिस्तानशिवाय निवडणुका जिंकून दाखवाव्यात : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा मुद्दा वगळून निवडणुका जिंकून दाखवाव्यात असे आव्हान आज खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काल पाचोरा येथील सभेत पंतप्रधान मोदी यांना टार्गेट करण्यात आले. विशेष करून उध्दव ठाकरेंनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. यानंतर आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधानांवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना ठाकर्‍यांची आहे. हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते बरोबर आहे. पण निवडणूक आयोगाला कळत नाही. त्यात चुकीचं काय? असं बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन त्यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला. राऊत म्हणाले की, भुजबळ यांच्या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Protected Content