भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आजादीच अमृत महोत्सव म्हणून पूर्ण देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज भुसावळ शहरातील रोटरी क्लबच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे व मुख्याधिकारी संदीप चंद्रीवार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त आजच्या पासून मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. भुसावळ शहरातील अष्टभुजा चौकातून रोटरी क्लबच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये पोलीस बांधव, विविध प्रशालेतील विद्यार्थी, नागरिक व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. शेकडोंच्या संख्येने ही रॅली भुसावळ शहरातून मार्गक्रमण करत पुढे महात्मा गांधी पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.