भुसावळात दोन गटांमध्ये धुमश्‍चक्री

भुसावळ प्रतिनिधी । शहरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवजयंतीनिमित्त कडू प्लॉटमधून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक आटोपल्यावर जितू भालेराव आणि मुकेश पाटील यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. दोन्ही गटांमध्ये तलवार, लोखंडी पाइप, लाकडी दांड्याने मारहाणीचा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी शांततेचे आवाहन केले. यामुळे काही तासांमध्ये परिसरात शांततेचे वातावरण पसरले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content