बिहार निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा भाजपचा डाव होता

औरंगाबाद : वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केला आहे. बिहारमधील एनडीएचा विजय मान्य नसल्याचंही ते म्हणाले . ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

“बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता. पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एनडीएला काटावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही असंही ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली.

“बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे.कोरोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?,” अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम करत असल्याची टीका केली.

Protected Content