बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृती दिन असून त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. या अनुषंगाने खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या सोबतचा जुना फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या वार्तालापात संजय राऊत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे ढोंगी वारसदार आहेत. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. याप्रसंगी त्यांनी राहूल गांधी यांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही? तुमचं एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या’’ असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केलं. तसेच, बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झालेले आहेत. मात्र ते टिकणार नाहीत. या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारली पाहिजे. बाळासाहेबांनाही अशी ढोंगं आवडत नव्हती, असा टोला देखील त्यांनी मारला.

 

 

Protected Content