पुलावर दुचाकी घसरल्याने एक ठार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या जांभोरा गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना दुचाकी घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत गोरख पाटील (वय-२८) रा. मंगरूळ ता. पारोळा असे मृत तरूणाचे नाव आहे. धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयवंत गोरख पाटील (वय-२८) रा. मंगरूळ ता.पारोळा हा गावातील श्याम भास्कर पाटील (वय-४०) रा. मंगरूळ यांच्यासोबत शनिवारी १७ डिसेंबर रोजी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडब्ल्यू ५७८७) ने धरणगाव तालुक्यातील धानोरे येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास श्याम भास्कर पाटील आणि जयवंत गोरख पाटील हे दुचाकीने मंगरूळकडे येण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकी श्याम पाटील हा चालवत होता. दरम्यान धरणगाव ते पारोळा रोडवर असलेल्या जांभोरा गावाजवळ पुलाजवळ अचानक दुचाकी घसरली यात मागे बसलेला जयवंत पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी वाहनाने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी घोषित केले. जयवंत पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालक श्याम भास्कर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.

Protected Content