दहावीचा भूगोल विषयाची परीक्षा रद्द : शालेय शिक्षण मंत्री गायकवाड

मुंबई, वृत्तसेवा । कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्याने लॉक डाऊन जाहीर झाल्याने दहावीचा भूगोल विषयाची परीक्षा होऊ शकली नव्हती. आता ही भूगोलाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावीची भूगोलाची परीक्षा रद्द करण्यात आली असून इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Protected Content