जळगाव,प्रतिनिधी । रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर सुशोभिकरण ८ दिवसाच्या आत सुरु करण्यात यावे. यात अद्यावत स्वरूपाचा स्मारकाच्या ५० फुटाच्या आत बगीचा करण्यात यावा. याठिकाणी कारंजा लावण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महानिर्वाण दिनी मोठ्या संख्येने नागरिक त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे येत असतात. परंतु, त्यांना तेथे व्यवस्थित उभे देखील राहता येत नसल्याने शुशोभीकरणाचे काम ८ दिवसात सुरु न करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गौरव सुरवाडे, रेल्वे स्टेशन आंबेडकर रिक्षा युनियन अध्यक्ष शांताराम अहिरे, अजिज बाबा शाह, इस्माइल खान, सईद हुसेन, विजय सोनवणे, गोपाल डोंगरे, शाम सोनवणे, चंद्रमणी मोरे, निलेश तायडे, राजेश तायडे, राकेश सपकाळे आदींची स्वाक्षरी आहे.