जिल्ह्यातील अकरा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण चौदा प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी अकरा प्रकरणे पात्र ठरली असून दोन प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले आहे.

 

बैठकीत पात्र ठरलेल्या शेतकर-यांची नावे पुढीलप्रमाणे – रामराव पांडुरंग पाटील, वाकडी, ता. जि. जळगाव, आबासाहेब अमृत काळे, कंडारी, ता. जि. जळगाव, संदिप ईश्वर चौधरी, शेंदुर्णी, ता. जामनेर, मोतीराम कौतिक पाटील, बेटावद, खु. ता. जामनेर, प्रफुल्ल अरुण पाटील, कर्की, ता. मुक्ताईनगर, गजानन घन:श्याम पाटील, म्हसवे, ता. पारोळा, समाधान करतारसिंग पाटील, गांधीपुरा, ता. एरंडोल, गुलाब लक्ष्मण महाजन (माळी) आडगाव, ता. एरंडोल, निलेश प्रमोद पाटील, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, मोतीलाल रामदास पाटील, सातोड ता. मुक्ताईनगर, गोपिचंद पुंडलिक पाटील, मांडवे, बु. ता. जामनेर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात करण्यात आली असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येते. या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य विश्वनाथ पाटील, रोहिदास पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आदि उपस्थित होते.

Protected Content