जिल्हा आयटकचा देशव्यापी मागणी दिनात सहभाग

 

चोपडा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य आयटकने ११ मे रोजी सर्व संघटित असंघटित कामगारांच्या मागणी दिवस पाळला अशी माहिती जळगाव जिल्हा आयटकतर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

मागणी दिन सोमवार ११ मे रोजी गेल्या ३ ते ६ महिने पगार न मिळालेल्या कर्मचारीही एक दिवस लाक्षणिक उपोषण करून काळ्या फिती लावून काम केले. आशा गट प्रवर्तक ३दिवस काळया फिती लावून कबुल केलेली मानधन वाढ मिळत नाही म्हणून निषेध केला. मागणी दिनाच्या मागण्या अशा..

गावी परत जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांना परतीची हमी निर्माण करा भाडे वसूल करणे बंद करा व त्यांना प्रवास खर्च द्या, रेशन सर्व गरजू कुटुंबांना पुरवा, त्यासाठी अंत्योदय, बीपीएल, एपीएल कार्डा सारख्या कोणत्याही अटी ठेऊ नका, सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वत्रिक करा, उज्वला योजना सर्व कामगार कुटुंबांना लागू करा ज्यांनी स्वतंत्र गॅस घातले त्यांनाही अनुदान द्या, कामगारांचा पगार बंद होणार नाही किंवा पगार कपात होणार नाही याची हमी निर्माण करा, कोविद-19 साथीचे निमित्त करून कामगार कायद्यांत मालकधार्जिणे बदल करणे खपवून घेतले जाणार नाही, किमान रु.७,५००/- दर महा, प्रत्येक कामगार कुटुंबाच्या खात्यात, त्यांना परत काम मिळेपर्यंत, निदान तीन महिने जमा करा. कोविद-19 साथीत अग्रभागी राहतं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य पुरवा, सरकारी व सार्वजनिक उद्योगातील कर्मचाऱ्यांनी कोविद-19 साथीत केलेल्या कामाला दाद द्या. सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांचा महागाई भत्ता रोखू नका, इपीएस 95 पेन्शनर्स ला आर्थिक मदत द्या. कोरोना योध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आशा, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेयपोषण आहार कर्मचारी,वीज कर्मचारी, बँक एलआयसी कर्मचारी, अँब्युलन्स वाहनचालक, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर, पत्रकार, जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय तील महसूल कर्मचारीना सन्मानाची माणूसकी ची वागणूक द्या.  सीआरपीएफ, एलसीआरपी यांच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष दयावे. कंत्राटी , मानधनावर कार्यरत कर्मचारी कामगारांना कायम करा . किमान वेतन २१ हजार द्या . ग्राम पंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार द्या.. डाटा ऑपरेटर.. रोजगार सेवक कायम सेवेत घ्या.   जळगाव जिल्ह्यातील १०००० कर्मचारी मागणी दीन पाळला असे या मागण्या मंजूर न केलेस लॉक डाऊन नंतर राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन, राजेंद्र झा, जे. एन. बाविस्कर..जिल्हा पदाधिकारी संतोष खरे, मलखन राठोड, कृष्णा महाजन, संदीप देवरे, सुभाष कोळी, शिवशंकर महाजन, मीनाक्षी सोनवणे, सुलोचना साबळे, शालिनी पाटील,मनीषा पाटील,वत्सला पाटील, प्रेमलता पाटील, ममता महाजन, उद्धव सांगोरे, किशोर कनडारे, गौरव सिंग पाटील, मीना काटोले, मंगला शिवदे, अश्विनी देशमुख आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Protected Content