जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

 

एरंडोल, प्रतिनिधी । आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना आदिल शाह फारूकी संस्थाचा वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय “”महाराष्ट्र गौरव पुरस्कार ” जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हयाचे भुषण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सध्या कल्याण मुंबई येथे आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र केवलसिंग पाटील यांना जाहीर करण्यात आले. कोरोनाकाळात रस्त्यावर राहणारे बेवारस, बेरोजगार. धुणी-भांडी करणारे.हात मजुरी करणारे ७०० लोकांना दिवस रात्र जेवण देण्याच कार्य करत होते. तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ”असेंनिकम अल्बम ३०”औषधी २० हजार लोकांना वाटप करण्यात आले . कोरोना या आजाराविषयी ऑनलाईन जनजागृती व सोशल डिस्टन्सिंग पेंट करून किराणा दुकानात. एटीएमजवळ, .भाजीपाला चा हात गाडी लोकांना लांब लांब उभे करण्यात आले कोरोना काळात गरजूंना हॉस्पिटलसाठी मदत करणे, लोकांच्या समस्या सोडवणे हा मानवतावादी दृष्टीकोण अंगीकारून हे प्रयत्न करत असे तसेच जितेंद्र पाटील हे मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मधून गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात शस्त्रक्रिया करून देतात. शस्त्रक्रिया करून देण्याचे कार्य गेल्या पाच वर्षापासून ते अविरतपणे करता आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवतात व गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्टीत पुरस्कार समजले जातात. आरोग्य सेवेतील या त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना “”महाराष्ट्र गौरव पुरस्कार “”जाहीर करण्यात आला आहे . यामुळे एका उचित व्यक्तींची सन्मान झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

Protected Content