जपानचे पंतप्रधान क्वाड सदस्य राष्ट्रांच्या विदेश मंत्र्यांना भेटले

टोकियो: वृत्तसंस्था । आशियाई भागात चीनच्या वाढत्या दादागिरीविरोधात जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिका, भारत व इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. जपानमध्ये ‘द क्वॉड्रिलॅटरल सिक्‍युरिटी डायलॉग सदस्य देशांमध्ये इंडो-पॅसिफिक भागात मुक्त वातावरण असावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जपानी पंतप्रधानांनी सांगितले की, चीनचा आक्रमक विस्तारवाद, दुराग्रह रोखणे हे कोरोनाच्या आव्हानापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी हिंदी-पॅसिफिक महासागर भागात शांतता असणे आवश्यक आहे. कोरोना समस्यांना रोखणे आवश्यकच आहे. त्याआधी चीनविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे संपूर्ण जग महासाथीच्या आजाराच्या आव्हानांचा सामना करत आहे. समविचारी अधिकाधिक देशांनी एकत्र येण्याची ही योग्य वेळ असून या देशांमध्ये समन्वय वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आजाराचे थैमान सुरू असतानाही अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री प्रत्यक्षात भेटून चर्चा करत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ देखील या बैठकीत सहभागी होण्यासाठी टोकियोत दाखल झाले बैठकीपूर्वी पॉम्पिओ यांनी चीनच्या वाढत्या आक्रमक विस्तारवादावर चिंता व्यक्त केली होती. चीनच्या या धोरणामुळे त्रासलेल्या देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिका आणि जपान मुक्त आणि खुल्या हिंदी-पॅसिफिक भागासाठी जागतिक समुदायाचे नेतृत्व करतील असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. या भागात शांतता असावी यासाठी जपानच्या पंतप्रधानांनी पुढाकार घेतला असून आम्ही त्याचे स्वागत करतो असेही त्यांनी म्हटले.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरदेखील सहभागी झाले आहेत. नियमांवर आधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्था, पारदर्शकता, नौवाहनाची स्वतंत्रता, वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे आदी मुद्यांवर भारत ठाम आहे.

काही महिन्यांपासून चीनची दादागिरी वाढली आहे. जपानपासून लडाखपर्यंत चीनची दादागिरी सुरू आहे. चीनला वठणीवर आणण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली चीनला रोखण्यासाठी भारत-जपान आपले संबंध आणखी मजबूत करत आहेत. इंडो-पॅसिफिक भागासाठी भारत-जपान-ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सुगा यांनी म्हटले होते.

‘दि क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वॉड)ची सुरुवात २००७ मध्ये करण्यात आली होती. त्याआधी भारताने २००४-०५ मध्ये भारताने दक्षिण-पूर्व आशियातील सुनामीग्रस्त देशांना मदत केली होती. क्वाडमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा समावेश आहे. क्वॉडमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनामनेही सहभाग घेतला.

Protected Content