चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनसोबत असणार्‍या सिमारेषेवर चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान ठार झाले असून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

लडाखच्यागलवानखोर्‍यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० सैनिक हुताात्मा झाल्याची माहिती समोर आली असून एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलाय. गलवान खोर्‍यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. उंचावरच्या गलवान हाणामारीत १७ गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी खाली आणण्यात आलं होतं. उंचावरच्या ठिकाणाच्या तपमानामुळे जखमींचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण २०भारतीय सैनिक हुतात्मा झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, दया चकमकीत चीनी सैन्याच्या ४३ जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Protected Content