गुन्हे लपविल्याप्रकरणी फडणवीसांवर चालणार खटला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला चालणार आहे.

 

अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमध्ये दाखल होते. परंतू 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवली होती. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतू न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे फडणवीसांविरोधात खटला चालणार आहे.

Protected Content