कोरोना : देशात सहा जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत ३४९  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस वाढता धोका लक्षात घेत रेल्वेने मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आज १० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामधील ६ मुंबईत आणि ४ पुण्यातील आहेत. महाराष्ट्रात एकूण संक्रमितांची संख्या ७४ झाली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक महिला कोरोना संक्रमित आढळून आली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक राज्यांनी लॉक डाऊन केलेले आहे.

Protected Content