३१ मार्चपर्यंत प्रवासी रेल्वेगाड्या रद्द

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत महत्वाच्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार असून याबाबत आजच्या मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यात ३१ मार्चपर्यंत देशातील बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला. यात लांब पल्ल्यांच्या सर्व रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

Protected Content