आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्व नागरी भागात आज (रविवार) मध्यरात्रीपासून राज्यात नाइलाजाने कलम 144 लागू केले जात असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकरण गर्दी करू नका. टोळक्यांमध्ये फिरू नका. ३१ मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यापुढे गरज पडल्यास आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते, सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत पहिला टप्पा आहे. कदाचित नंतर वाढवावा लागेल. दूध धान्य भाजीपाला सुरू राहिल. आर्थिक संस्था सुरू राहतील. सरकारी कार्यालयात पाच टक्के उपस्थिती राहिल. तसेच जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना सूट दिली जाणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content