कोरोना काळात शिवसैनिकांनी नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या शाखा बंद असतांना भाजप कार्यकर्त्यांनी थेट मदत केली असल्याचे सांगत आज देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

 

भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. आताचं सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

Protected Content