कोरोना काळात दाखल गुन्हे मागे घेणार-गृहमंत्री

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत संचारबंदीच्या उल्लंघनासह अन्य दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर आयपीसी सेक्शन १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबतमी माहिती दिली आहे.

Protected Content