ऊसाची बांडी मागीतल्यावरून तरूणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | गुरांसाठी ऊसाची बांडी मागीतल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाघडू येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघडू येथील अक्षय रमेश पाटील (वय-१६ ) या तरूणाने ऊसाची बांडी विक्री करणाऱ्या इसमांकडून गुरांसाठी बांडी मागीतली. याचाच राग येऊन प्रकाश चिंतामण पाटील, महेंद्र प्रकाश पाटील व भुषण प्रकाश पाटील सर्व. रा. वाघडू ता. चाळीसगाव आदींनी संगनमताने अक्षय पाटील याला जबर मारहाण केली. दरम्यान महेंद्र प्रकाश पाटील यांनी लाकडी दांडका असलेल्या फावडीने उजव्या कानाजवळ व कमरेच्या उजव्या बाजूला मारहाण केली. तसेच भुषण प्रकाश पाटील यांनी जमीनीवरील दगड उचलून पाठीवर व कमरेवर मारहाण केली. यात अक्षयला गंभीर दुखापती झाली. हि घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे वरील तिन्ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भगवान उमाळे हे करीत आहेत.

Protected Content