अहीरवाडीत लंम्पी आजाराने बैल दगवला

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लंम्पी या आजाराने अहीरवाडी येथे बैलाचा मृत्यू झाला असून इतर अनेक गुरांवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे पशुधन पाळीव करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

रावेर व यावल तालुक्यात गुरांवर मोठ्या प्रमाणात लंम्पी आजार पसरत आहे. अहीरवाडी येथील रविंद्र सावळे यांच्या बैलाचा लंम्पी आजाराने मृत्यू झाला असून पशुधन पाळीव करणा-यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. नुकतेच पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावेर तालुक्यात लंम्पीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती.

Protected Content