अफगाणिस्तानातून भारतीयांना मायदेशी बोलावले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परिस्थिती हातभार जात असल्याने आता भारत सरकारने   अफगाणिस्तानातून भारतीयांना मायदेशी बोलावले आहे

 

तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. तालिबानने आतापर्यंत सहा प्रांतीय राजधान्या  ताब्यात घेतल्या आहेत.  भारत सरकारने अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार-ए-शरीफ येथून आपले मुत्सद्दी आणि नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात आज   संध्याकाळी अफगाणिस्तानातील उत्तर शहर मजार-ए-शरीफ येथून एक विशेष विमान नवी दिल्लीला रवाना होणार आहे.

 

अफगाणिस्तानच्या बल्ख आणि तखार प्रांतात तालिबान लढाऊ आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये तीव्र लढाई दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानने अलीकडेच उत्तर बल्खचे अनेक भाग काबीज केले. आता त्यांचे लक्ष्य मजार-ए-शरीफ आहे. मजार-ए-शरीफ बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर आहे.

 

ज्या भारतीय नागरिकांना विशेष उड्डाणाने जायचे आहे त्यांनी त्यांचे पूर्ण नाव आणि पासपोर्ट नंबर सारखे तपशील तातडीने वाणिज्य दूतावासात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे १५०० भारतीय सध्या अफगाणिस्तानमध्ये राहतात. गेल्या महिन्यात भारताने कंधारमधील आपल्या दूतावासातून सुमारे ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत बोलावले होते.

 

Protected Content