अतुल भातखळकरांचा पवारांवर निशाणा

 

 

मुंबई : प्रतिनिधी । कृषी कायद्यांवरून केंद्रावर टिका करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारवर वारंवार टीका केली होती. राज्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता किंवा मतं जाणून न घेताच केंद्रानं कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही, असं म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्राने कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही. पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे आयपीएल सामने मात्र भरवता येतात, असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला.

Protected Content