अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी

यवतमाळ प्रतिनिधी । ९२ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सकाळी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला असून संमेलनाचे विधीवत उदघाटन सायंकाळी होणार आहे.

नयनतारा सहगल यांना दिलेले आणि नाकारलेल्या आमंत्रणावरून साहित्य संमेलन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी यवतमाळ शहरातून ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनास प्रारंभ करण्यात आला आहे. अतिशय उत्साहात ही दिंडी निघाली असून यात साहित्यीकांसह यवतमाळकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Add Comment

Protected Content