जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तूरखेडा येथील ४० वर्षीय तरूणाने शहरातील कांचन नगर येथे पत्नीच्या घरी दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविंद्र सुर्यवंशी हे मुलगा दिपक सुर्यवंशी यांच्यासह तुरखेडा येथे वास्तव्याला आहे. इमारतीचे बांधकाम करून उदरनिर्वाह करतात. तर पत्नी सुरेखा सुर्यवंशी ह्या जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे. त्या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा दिपक हा पत्नी सुरेखाकडे राहण्यासाठी आला होतो. त्यामुळे त्याला घेण्यासाठी रविंद्र सुर्यवंशी हे सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला घेण्यासाठी कांचन नगर येथील पत्नीच्या घरी आले होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा ह्या कामानिमित्त बाहेर गेले असतांना रविंद्र यांनी घराचा दरवाजा आत बंद करून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. यासंदर्भात पत्नी सुरेखा व मुलगा दिपक हे घरी आले असता दरवाजा आतून बंद होता. शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले तर रविंद्र सुर्यवंशी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अभिजित सैंदाणे करीत आहे.