दोन माजी सरपंचांना वसुलीची नोटीस : तालुक्यात खळबळ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या दोन तत्कालीन सरपंचांना अपहार केल्याप्रकरणी वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की टाकरखेडा तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सौ . शारदा अनिल महाजन व गोकुळ महेंद्रसिंग चौधरी आणी त्यांच्या सरपंच कार्यकाळातील ग्रामसेवक नागथाथ विष्णु गायकवाड व दिनेश रमेश पाटील यांनी सेवेत कार्यरत असतांना संगनमताने केलेल्या सन२०१३-१४ ते २०१७-१८दरम्यान ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचे लेखा परिक्षण अहवालात आक्षेप घेण्यात आलेले आहेत.

याबाबत पंचायत समितीच्या वतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर संदर्भ जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडील ग्राप/१ / आरआर / ८१४/२०२२पत्रा अन्वये आक्षेपाची पुर्तता महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८चे कलम १४० ( २ ) ( ३ ) व( ४ ) नुसार ३ महीन्यांच्या आत करणे आवश्यक असतांना तसे केलेले नाही . तसेच पंचायतीच्या मासिक सभेत विषय क्र७ / १व ठराव क्रमांक७ / १ अन्वये एकुण १६६ आक्षेपांची पुर्तता बरोबर असुन स्वीकृतीस वरिष्ठ कार्यालयाकडेस पाठविण्यात यावे असा ठराव टाकरखेडा ग्रामपंचायतीने केलेला आहे. सदर विषय रितसर अजेंडयावर घेवुन त्यास मान्यता घेवुन पाठविणे गरजेचे असतांना तसे केलेले नाही.

सदर लेखा परिक्षण आक्षेपात एकुण रूपये ५ लाख८९ हजार र०८ इतकी वसुली झालेली आहे. त्या पैकी तत्कालीन सरपंच सौ शारदा अनिल महाजन , गोकुळ महेन्द्रसिंग चौधरी यांच्याकडून प्रत्येकी रूपये १ लाख४७ हजार३०२ इतकी रक्कम वसुलीस पात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सदरची रक्कम संबधीतांकडुन वसुल करून तात्काळ ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यात रितसर भरणा करून पावती संबधीतांना देवुन या संदर्भातील सविस्तर माहीती छायांकित प्रतिसह पंचायत समिती यावल कार्यालयास सादर करावी असे आदेश देण्यात आले आहे.

तसे न केल्यास आपल्या कडील लेखा परिक्षण आक्षेपाची थकीत वसुलीच्या रक्कमेची पुर्तता करण्यासाठी जमीन महसुलची थकबाकी म्हणुन धरण्यात येवुन आपल्या संपत्तीवर बोजा बसविण्याची कार्यवाही तहसीलदार यावल मार्फत करण्यात येणार असल्याचे या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे .

या संदर्भात मात्र ज्या दोघ तत्कालीन ग्रामसेवकांच्या कार्यकाळात हा आर्थिक घोळ झाला आहे त्या ग्रामसेवकांना अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस पाठविण्यात आली नसल्याने प्रशासनाकडुन संबधीतांना वाचविण्याचा तर प्रयत्न होत नाही ना ? असा प्रश्न तक्रारकर्ते व टाकरखेडा ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Protected Content