धरणगाव प्रतिनिधी । शहरात राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ व थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली आहे. तसेच यावेळी विविध पदाधिकारी महिलांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी गावातील ज्या महिला सरकारी नोकरी किंवा विशेष काम करीत आहेत. अशा महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील व आश्रम शाळेतील मुलांना फरसाण व मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला बिलखेडे गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.सदस्य, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, बिलखेडे गावाचे तलाठी, गावातील महिला, गावातील ग्रामस्थ, पोलिस पाटील, तरुण मित्र व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे आयोजन तालुक्यातील बिलखेडे येथील राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज युवक मित्र मंडळच्या वतीने करण्यात आले होते.