शिवाजी महाराजांसोबत मोदींच्या तुलनेबाबत भाजपने संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करावी : राऊत

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का? तसेच भारतीय जनता पक्षाने हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे. तसेच आज संध्याकाळपर्यंत राज्य भाजपने या पुस्तकाबाबत आपले काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे, राज्यातील जनतेलाही ते जाणून घ्यायचे आहे, असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

 

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर सर्व स्तरांतून चौफेर टीका होत आहे. यावर संजय राऊत यांनी देखील भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. या पुस्तकाशी आपला संबंध नाही हे आज संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याचा शाब्दिक प्रहार राऊत यांनी केला आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना नसावी, म्हणून त्यांना दोषी धरता येणार नाही, असेही राऊत यांनी आवर्जून म्हटले आहे.

Protected Content