विजबिल थकल्याने वराड गावातील पाणीपुरवठा बंद

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ऐन होळीच्या दिवशी बोदवड तालुक्यातील वराड गावाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, वीज बिल थकल्याने महावितरणने केलेल्या वीज कनेक्शन कटचा फटका ग्रामस्थांना बसला आहे.

वीजबिल थकीत असल्या मुळे महावितरण ने वीज कनेक्शन कट  केले असून गावकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच ग्रामपंचायती चे हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांना सना सुध्दीच्या दिवसात पाण्याविना राहावे लागत आहे. तसेच या गोष्टीला जबाबदार कोण ग्रामपंचायत, ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य का गावातील जनता असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा या बाबीकडे काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

Protected Content