सिंचनासह विविध विकास कामांना चालना मिळणार – गुलाबराव देवकर

wadishewade

पाचोरा प्रतिनिधी । खोटी आश्वासने देऊन राज्यासह केंद्रात सत्तेत आलेल्या सत्ताधारी सरकारवर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता नाराज आहे. निवडणुकीपुर्वी दिलेल्या एकही आश्वासनांची पूर्तता या शासनाने केली नाही. उलट वाढत्या महागाईने जनता आज हैराण झाली आहे. जनतेने आता ही नाराजी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करत महाआघाडीस संधी द्यावी. परिवर्तन झाले तरचं सिंचनासह विविध सर्वांगीण विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास आज वाडी शेवाळे येथील ग्रामस्थ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केले.

यावेळी यांची होती उपस्थिती
गुलाबराव देवकर यांचा आज पाचोरा तालुक्यातील वाडीशेवाळे येथे प्रचारार्थ भेट दिली असता नागरीकांनी सत्ताधारी सरकार यांच्यावर नाखूष असल्याचे सांगत रोष व्यक्त केला. तसचे ग्रामस्थांनी देखील सत्ता परिवर्तनाचे आश्वासन दिले. यापुर्वी गावात प्रचार रॅलीद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधत परिवर्तनाचे आवाहन केले. यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, ज्येष्ठ नेते खलील देशमुख, नितीन तावडे, नगरसेवक भुषण वाघ, विकास पाटील, भगवान मिस्त्री, दिनकर पाटील, पं.स.सदस्य ललीत वाघ, मजुर फेडरेशन उपसभापती प्रकाशबापु पाटील, आर्किटेक्ट अजय सोनवणे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

One Response

  1. निलेश सावळे

Add Comment

Protected Content